उतारावाचन MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for उतारावाचन - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]

Last updated on Mar 21, 2025

পাওয়া उतारावाचन उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). এই বিনামূল্যে ডাউনলোড করুন उतारावाचन MCQ কুইজ পিডিএফ এবং আপনার আসন্ন পরীক্ষার জন্য প্রস্তুত করুন যেমন ব্যাঙ্কিং, এসএসসি, রেলওয়ে, ইউপিএসসি, রাজ্য পিএসসি।

Latest उतारावाचन MCQ Objective Questions

Top उतारावाचन MCQ Objective Questions

उतारावाचन Question 1:

Comprehension:

पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

एक असामान्य कलाकृती वाचण्याचा सर्वात मोठा बहुमान बहुधा हाच असतो की, आम्ही आमच्यातच दबलेल्या, विस्मृतीत गेलेल्या आवाजांना ऐकायला लागतो ज्यांचा आभासदेखील आम्हाला कधी जाणवला नव्हता. आम्ही एखादी कलाकृती वाचतो तेव्हा इतरांच्या आत्म्यांमध्ये आम्ही प्रवेश करत नाही तर इतरांना आमच्यात प्रवेश करू देतो. शेक्सपीअरचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट, टॉलस्टॉयचा इवान इलीच, प्रेमचंदांचा होरी किंवा जैनेंद्रकुमारांची मृणाल आमच्या आत आहे. हजारो वेळा ऐकलेली एक गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते की, एखादी कलाकृती आमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कदाचित देऊ शकणार नाही, पण आमचा प्रश्न अधिक तीक्ष्ण आणि टोकदार करण्याचं कार्य ती निश्चित करते. वाचकाला एखादी कलाकृती वाचून कुठेतरी वेगळं व्हायचं नसतं तर आणखी स्पष्टपणे स्वतःला शोधण्यासाठी तो ती कलाकृती वाचत असतो.

इथं आम्ही कधीही न संपणारा शोध घेऊ शकतो. वाचनाच्या ह्या अनुभवानं कितीतरी असंबद्ध आणि दूरवर विखुरलेल्या वस्तूंशी आम्हाला जोडलंय. आम्ही ह्या अनुभवात एकाच वेळी स्थिर, भटके, एक मनोवैज्ञानिक, तत्त्वज्ञ, इतिहासकार, सौंदर्य उपासक आणि अराजकतेनं व्यापलेले आणि थोडेसे भावनिक झालेले असतो.

या पुस्तकांच्या जगात शिरल्यावर आम्ही बालपणी हरवलेल्या निष्पापतेला, आपल्या अनामिका शंका आणि स्वप्नांना, संभ्रमांना, शहरांना, जुन्या दिवसांना, प्रेमाच्या अनिवार्यतेला, आणि विश्रांतीच्या नैसर्गिकतेला, पुन्हा एकवार अनुभवू शकतो. ते सगळं जे ह्याच जीवनात घडलं आणि ह्याच तळहातांमधून निसटून गेलं.

ज्या काळातून आम्ही मार्गक्रमण करतोय त्या काळातच 'स्थलांतर', 'विस्थापन' हे सर्वांत मोठं 'रूपक' आहे. माणसाचं त्याच्या स्वत:च्या भूतकाळापासून मुळांपासून परंपरा, परिवेश, भाषा, संस्कृती, नातीगोती, गल्ल्या - बोळातून आणि शहरांतून विस्थापन होतंय आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्याचं त्याच्या स्मृतींपासून विस्थापन होतंय. आमच्या समकालीन अवस्थेत प्रत्येक असामान्य कलाकृतीमध्ये लेखक प्रामुख्यानं एक शरणार्थी आहे. तो दारोदार भटकणारा एक निर्वासित आहे. जो आपल्या संदुकांसह, सामानासह खूप गल्लीबोळातून / शहरांतून आणि काळाला घेऊन जीवनमूल्यांना आणि असंख्य विश्वासांना आपल्या खांद्यावर वाहून नेतोय. ह्या सगळ्या गोष्टी त्याला एक सजीव आणि स्पंदनशील माणसाच्या रूपात व्यक्त करत आल्या आहेत. सगळीकडे असत्य, विकृती आणि तोडफोडीच्या विध्वंसक परिस्थितीत तो आपलं हे सामान वाचवू पाहातोय. इथल्या शक्तिकेंद्रांचं प्रचारतंत्र एवढं भयावह आहे की ते नाहीशा होणाऱ्या सर्व गोष्टींना एका सहजप्रक्रियेत रूपांतरित करत आहे. प्रत्येक मूलभूत संकट आमच्यासाठी केवळ एक 'वस्तुस्थिती' होऊन जातेय. आम्ही सारं काही विस्मृतीत घालवण्यासाठी शापीत झालो आहोत. अशा परिस्थितीत जर एखादी कलाकृती आमच्या कुठल्याशा राहून गेलेल्या सामानाकडे, हरवलेल्या वस्तूंकडे निर्देश करत असेल तर विजेच्या कल्लोळासारखा हा अनुभव असतो आणि आतापर्यंत या जगाच्या पूर्णत्वाचं जे चित्र आम्हाला दाखवलं जात होतं ते किती खोटं आणि विश्वासघातकी होतं याची कल्पना येते. एक असामान्य कलाकृती आम्हाला ढासळलेल्या भग्नावशेषातून सत्याची पुनर्रचना करण्याचं प्रोत्साहन देते.

प्रस्तुत उताऱ्यातील भाषाशैलीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे?

  1. विचारप्रधान
  2. आस्वादप्रधान
  3. कल्पनाप्रधान
  4. बोलीप्रधान

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : आस्वादप्रधान

उतारावाचन Question 1 Detailed Solution

उत्तर- आस्वादप्रधान

उताऱ्याचा मतितार्थ-

  • उपरोक्त उतारा कलाच्या महत्त्वाच्या प्रश्नांची ओळख करण्यासाठी तसेच त्याच्या स्वरूपाच्या आणि प्रभावाच्या वापराच्या संदर्भात दिलेला आहे.
  • कलेच्या क्षेत्रात विद्यमान अनेक विचारधारांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना, त्याच्या स्वरूपातील भागांची अनुभूती करतांना, त्याच्या कलाकृतीच्या पाठीमागच्या पाठांचे विचार करतांना, विचारांचे प्रभाव आणि विस्तृतीकरणाचे प्रयास करतांना हे उतारा आपल्याला पुन्हा आणखी एकदा वाचण्याचा प्रेरणा देतो.
  • त्यातील गोष्टी विविध प्रकारच्या अनुभवांशी जोडलेल्या असतात, जी आपल्या स्वभावाच्या विचारांना, ऐतिहासिक विवरणांना, सौंदर्याच्या उपासनेसाठी, अनुभवांच्या प्रमाणित तत्त्वांसह, आणि अराजकतेच्या आणि भावनिकतेच्या अंशांसह सामर्थ्याशी भरलेल्या आहेत.

Important Pointsस्पष्टीकरण-

  • प्रस्तुत उताऱ्यामध्ये विचारांचे स्पष्टीकरण आणि विवेचन करण्याच्या माध्यमातून अनुभवांची अधिक अचूकता आणि अनुभवांच्या संवेदनशीलतेची प्रतिष्ठा यात केली आहे.
  • प्रस्तुत लेखनात जी विचारांची विस्तृत वर्णने आहेत आणि जो जीवनातील पूर्णता आणि विश्वासांना वाहून नेते, ती आस्वादप्रधान भाषाशैलीची आहे.

उतारावाचन Question 2:

Comprehension:

निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

1960-70 च्या दशकांत एकंदरीत जग भरातच अनेक ठिकाणी राजकीय पर्यावरण तापलेले होते. फ्रान्समधील विद्यार्थी कामगारवर्गासह रस्त्यावर उतरून राज्यसत्तेशी संघर्ष करत होते. अमेरिकेतील देश-विदेशी, काळे-गोरे तरुण व्हिएतनामला नामशेष करायला निघालेल्या सरकारचा कडवा निषेध करत होते. जपानमधील तरुणांमध्ये जरी राजकीय प्रवृत्तींचा प्रादुर्भाव नंतरच्या काळात झाला तरी नव-डाव्या विचाराने प्रेरित झालेले तरुण युद्धविरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत होते. चीनमध्ये माओने सुरु केलेल्या अभूतपूर्व सांस्कृतिक क्रांतीचा नंतरचा प्रवास जरी संधिसाधू दडपशाहीने बाधित झाला असला तरीही सुरुवातीला तेथल्या तरुणांनी परिवर्तनाचा हा सांस्कृतिक पैलू उचलून धरला होता.

अशा या आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरणात आपल्या देशातील राजकीय वातावरण जनचळवळीच्या दृष्टीने वेगवान बनत होते. स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांच्या आशा-आकांक्षांना फुटलेले धुमारे कोमेजून जात होते. शहर औद्योगिक क्षेत्रात मंदीची प्रचंड लाट 1967 पासुनच घोंगावत होती. 1960-61 नंतर सुरू झालेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीचा बहर ओसरू लागला होता. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली जुलमी, शोषक जमीनदार विरुद्ध आदिवासींचा सशस्त्र लढा उभारणारी चळवळ पसरत होती. दलित पँथर्स, स्त्री-मुक्ती संघटना, युवक क्रांती दल, एक गाव - एक पाणवठा, लोकविज्ञान संघटना, पेवलो फ्रेरी यांच्या कॉन्शनटायझेशन पद्धतीचा अवलंब करणारा आणि विज्ञान विषयक शिक्षण देऊ पाहणारा होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्राम अशा संघटनांच्या चळवळी जोर धरत होत्या. मागोवा गटासारखा मार्क्सवाद मानणारा जहालमतवादी गट युवकांमध्ये, कामगारात आणि ग्रामीण भागात कार्य करू लागला होता. समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे पाच पक्ष एकत्र येऊन कामगार शेतकऱ्यांच्या लढ्याचे पुढारपण करत होते. मजूर संघर्ष वाहिनीचे व्यापक अस्तित्व जाणवत होते. जनसमुदाय हलत होते. उत्स्फूर्त तसेच संघटित लढे ठिकठिकाणी उद्भवू लागले होते. महागाई, गरिबी, दुष्काळ हे मुद्दे घेऊन अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष छेडले जात होते.

महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील शहादे परिसरात धडाडीच्या आदिवासी तरुण अंबरसिंग सुरत वंती आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या रक्तात बुडवलेल्या लेखणीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहून आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संताप व्यक्त केला होता. आदिवासी स्थानिक तरुण कार्यकर्ते त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. सर्वोदयचे नेते व कार्यकर्ते होतेच. लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, त्यांचे नेते शहाद्याला येऊ लागले. बाबा आमटे यांच्या सोमनाथ च्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातील तरुण कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, ग्रामीण भागात चळवळ करू इच्छिणाऱ्या, काही शहरी मध्यमवर्गीय तरुणांनी शहादेव परिसरात कार्य करण्याचा निर्णय केला. 

नक्षलवादी असो, युवक क्रांती दल असो, दलित पँथर्स असो, किंवा मागोवा गट आणि त्यांच्याशी संबंधित शहरी-ग्रामीण भागात काम करणाऱ्या श्रमिक संघटना; त्यांच्या राजकीय-तात्विक रोख 'निवडणुकांच्या समन्वयवादी, संधीसाधू राजकारणामुळे परिवर्तनाच्या पायाभूत कार्याला खीळ बसत आहे', हा होता जरी या संघटनांमध्ये खूप राजकीय व वैचारिक मतभेद असले तरी या मुद्द्याबाबत त्यांची धारणा सारखीच होती. 

कामगार, शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायिक अशा श्रमिकांचे श्रमिक म्हणून असणारे प्रश्न घेऊन चळवळ करत असतानाच दलित, आदिवासी. भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक महिला अशा सामाजिक सामुहिक घटकांचे विशेष प्रश्न घेऊन मुद्दाम चळवळ करावी लागते.

कोणते मुद्दे घेउन तीव्र संघर्ष छेडले जात होते?

  1. महागाई
  2. गरीबी
  3. दुष्काळ
  4. वरील सर्व

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : वरील सर्व

उतारावाचन Question 2 Detailed Solution

उत्तर: महागाई, गरीबी आणि दुष्काळ 

स्पष्टीकरण:

1) मागोवा गटासारखा मार्क्सवाद मानणारा जहालमतवादी गट युवकांमध्ये, कामगारात आणि ग्रामीण भागात कार्य करू लागला होता.

2) समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे पाच पक्ष एकत्र येऊन कामगार शेतकऱ्यांच्या लढ्याचे पुढारपण करत होते.

3) मजूर संघर्ष वाहिनीचे व्यापक अस्तित्व जाणवत होते. जनसमुदाय हलत होते.

4) उत्स्फूर्त तसेच संघटित लढे ठिकठिकाणी उद्भवू लागले होते.

5) महागाई, गरिबी, दुष्काळ हे मुद्दे घेऊन अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष छेडले जात होते.

उतारावाचन Question 3:

Comprehension:

निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

1960-70 च्या दशकांत एकंदरीत जग भरातच अनेक ठिकाणी राजकीय पर्यावरण तापलेले होते. फ्रान्समधील विद्यार्थी कामगारवर्गासह रस्त्यावर उतरून राज्यसत्तेशी संघर्ष करत होते. अमेरिकेतील देश-विदेशी, काळे-गोरे तरुण व्हिएतनामला नामशेष करायला निघालेल्या सरकारचा कडवा निषेध करत होते. जपानमधील तरुणांमध्ये जरी राजकीय प्रवृत्तींचा प्रादुर्भाव नंतरच्या काळात झाला तरी नव-डाव्या विचाराने प्रेरित झालेले तरुण युद्धविरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत होते. चीनमध्ये माओने सुरु केलेल्या अभूतपूर्व सांस्कृतिक क्रांतीचा नंतरचा प्रवास जरी संधिसाधू दडपशाहीने बाधित झाला असला तरीही सुरुवातीला तेथल्या तरुणांनी परिवर्तनाचा हा सांस्कृतिक पैलू उचलून धरला होता.

अशा या आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरणात आपल्या देशातील राजकीय वातावरण जनचळवळीच्या दृष्टीने वेगवान बनत होते. स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांच्या आशा-आकांक्षांना फुटलेले धुमारे कोमेजून जात होते. शहर औद्योगिक क्षेत्रात मंदीची प्रचंड लाट 1967 पासुनच घोंगावत होती. 1960-61 नंतर सुरू झालेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीचा बहर ओसरू लागला होता. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली जुलमी, शोषक जमीनदार विरुद्ध आदिवासींचा सशस्त्र लढा उभारणारी चळवळ पसरत होती. दलित पँथर्स, स्त्री-मुक्ती संघटना, युवक क्रांती दल, एक गाव - एक पाणवठा, लोकविज्ञान संघटना, पेवलो फ्रेरी यांच्या कॉन्शनटायझेशन पद्धतीचा अवलंब करणारा आणि विज्ञान विषयक शिक्षण देऊ पाहणारा होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्राम अशा संघटनांच्या चळवळी जोर धरत होत्या. मागोवा गटासारखा मार्क्सवाद मानणारा जहालमतवादी गट युवकांमध्ये, कामगारात आणि ग्रामीण भागात कार्य करू लागला होता. समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे पाच पक्ष एकत्र येऊन कामगार शेतकऱ्यांच्या लढ्याचे पुढारपण करत होते. मजूर संघर्ष वाहिनीचे व्यापक अस्तित्व जाणवत होते. जनसमुदाय हलत होते. उत्स्फूर्त तसेच संघटित लढे ठिकठिकाणी उद्भवू लागले होते. महागाई, गरिबी, दुष्काळ हे मुद्दे घेऊन अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष छेडले जात होते.

महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील शहादे परिसरात धडाडीच्या आदिवासी तरुण अंबरसिंग सुरत वंती आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या रक्तात बुडवलेल्या लेखणीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहून आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संताप व्यक्त केला होता. आदिवासी स्थानिक तरुण कार्यकर्ते त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. सर्वोदयचे नेते व कार्यकर्ते होतेच. लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, त्यांचे नेते शहाद्याला येऊ लागले. बाबा आमटे यांच्या सोमनाथ च्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातील तरुण कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, ग्रामीण भागात चळवळ करू इच्छिणाऱ्या, काही शहरी मध्यमवर्गीय तरुणांनी शहादेव परिसरात कार्य करण्याचा निर्णय केला. 

नक्षलवादी असो, युवक क्रांती दल असो, दलित पँथर्स असो, किंवा मागोवा गट आणि त्यांच्याशी संबंधित शहरी-ग्रामीण भागात काम करणाऱ्या श्रमिक संघटना; त्यांच्या राजकीय-तात्विक रोख 'निवडणुकांच्या समन्वयवादी, संधीसाधू राजकारणामुळे परिवर्तनाच्या पायाभूत कार्याला खीळ बसत आहे', हा होता जरी या संघटनांमध्ये खूप राजकीय व वैचारिक मतभेद असले तरी या मुद्द्याबाबत त्यांची धारणा सारखीच होती. 

कामगार, शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायिक अशा श्रमिकांचे श्रमिक म्हणून असणारे प्रश्न घेऊन चळवळ करत असतानाच दलित, आदिवासी. भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक महिला अशा सामाजिक सामुहिक घटकांचे विशेष प्रश्न घेऊन मुद्दाम चळवळ करावी लागते.

अराजकीय प्रवृत्तीमध्ये पुढीलपैकी कोणती कृती समाविष्ट होत नसावी?

अ) राज्य सत्तेशी संघर्ष करणे

ब) युद्धविरोधी भूमिका घेणे

क) सांस्कृतिक परिवर्तन करणे

  1. फक्त ब
  2. अ आणि ब 
  3. ब आणि क 
  4. अ, ब, आणि क

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अ, ब, आणि क

उतारावाचन Question 3 Detailed Solution

उत्तर: अ, ब, आणि क
स्पष्टीकरण:

पहिल्याच परिच्छेदातुन आपणास कळते की अराजकीय प्रवृत्तीमध्ये 'राज्य सत्तेशी संघर्ष करणे', 'युद्धविरोधी भूमिका घेणे' आणि 'सांस्कृतिक परिवर्तन करणे' या कृती समाविष्ट होत नाहीत.

1) 1960-70 च्या दशकांत एकंदरीत जग भरातच अनेक ठिकाणी राजकीय पर्यावरण तापलेले होते.

2) फ्रान्समधील विद्यार्थी कामगारवर्गासह रस्त्यावर उतरून राज्यसत्तेशी संघर्ष करत होते.

3) जपानमधील तरुणांमध्ये जरी राजकीय प्रवृत्तींचा प्रादुर्भाव नंतरच्या काळात झाला तरी नव-डाव्या विचाराने प्रेरित झालेले तरुण युद्धविरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत होते.

4) चीनमध्ये माओने सुरु केलेल्या अभूतपूर्व सांस्कृतिक क्रांतीचा नंतरचा प्रवास जरी संधिसाधू दडपशाहीने बाधित झाला असला तरीही सुरुवातीला तेथल्या तरुणांनी परिवर्तनाचा हा सांस्कृतिक पैलू उचलून धरला होता.

उतारावाचन Question 4:

Comprehension:

निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

भारत एक राष्ट्र आहे. भारतातील जनता एक आहे. हे आज नव्याने सांगण्याची गरज नाही. हजारो वर्षांचा इतिहास याला आहे. केवळ भौगोलिक दृष्टीने नव्हे तर ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिनेही हे सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. इतिहासपूर्वकाळापासून भारताची ही एकता प्रस्थापित झालेली आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते बंगाल-आसामपर्यंतचा हा भूप्रदेश सलग आहे. एकसंघ आहे. या भूमीची जनता एकाच मातीची आहे. त्याच मातीतून ती जोपासली गेलेली आहे. या मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीचा सुगंध तिच्या मनात दरवळत राहिलेला आहे.  

गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी आणि तुंगभद्रा या नद्यांचे आशीर्वाद जनतेला विवाह मंगलात मिळालेले आहेत. त्यांच्यातील पाण्याने भारतातील प्राचीन नृपतिंच्या शिरावर राज्यरोहण प्रसंगी अभिषेक होऊन ते पावन होत असत. उत्तर भारतातील भगवान रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने केवळ उत्तर-भारतीयांचीच नव्हे तर दक्षिण-भारतीयांचीच अंतःकरणे उचंबळून येतात, हे जितके खरे आहे तितकेच दक्षिण भारतातील आमच्या आचार्यानी भारतीय संस्कृतीचा ध्वज केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेतही मोठ्या डौलाने फड़कत ठेवला आहे, हेही खरे नाही काय? गंगेची कावड रामेश्वरला पाठवण्यात व रामेश्वरचा सेतू गंगेत सोडण्यात ही जनता स्वतःला कृतार्थ समजते. तिच्या सांस्कृतिक एकात्मतेची ग्वाही देण्याला आणखी काय पाहिजे? सांस्कृतिकदृष्टया एकात्म असलेल्या या राष्ट्रावर अनेकानी स्वार्या केल्या, अनेक राज्ये आली आणि गेली. पण या एकत्मतेत खंड पडला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी घडलेल्या अनेक चित्तथरारक आणि रोमहर्षक प्रसंगातून याचीच प्रत्ययकारी जाणीव सर्व जगाला झाली नाही काय? बंगालची शकले करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्रातील लोकमान्यांनी उग्र चळवळ केली आणि जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा सगळा देश पेटला हे तरी कशाचे लक्षण आहे?

दिलेल्या परिच्छेदास अनुरूप शीर्षक द्या.

  1. भारताची धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी
  2. स्वातंत्र्य चळवळीचा क्रांतिकारक इतिहास
  3. भौगोलिक समानता
  4. एक राष्ट्र - एक जनता

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : एक राष्ट्र - एक जनता

उतारावाचन Question 4 Detailed Solution

उत्तर: एक राष्ट्र - एक जनता

स्पष्टीकरण: 

वरील उतार्यावरून आपणास असे लक्षात येते की लेखकाने भारतातील विविधतेतील ऐक्य किती सुंदर प्रकारे मांडले आहे. येथे लेखक सांगू इच्छितो की भारत जरी भौगोलिक दृष्टया विभिन्न असला तरी उत्तरे कडून दक्षिणे पर्यंत असलेला सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक गोष्टी, राजकीय चालीरीती, उलाढाली, स्वातंत्र्यापूर्वीची उग्र आंदोलने आणि या सर्व गोष्टीना भारतीय जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद, यावरून एवढेच लक्षात येते की भारतातील ऐक्य अफाट आहे आणि कोणीच त्यामध्ये खंड पाडू शकत नाही.

म्हणून वरील उतार्यास 'एक राष्ट्र - एक जनता' हे शीर्षक योग्य आहे.

उतारावाचन Question 5:

Comprehension:

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:

धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही. धनाचे दान हे धर्मदृष्टीने केवढे पुण्य आहे? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली? त्यानी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या. अन्नछत्रे घातली. त्यासाठी उत्पन्न नेमून दिले. पण रुग्णालयांसाठी, पाटबंधाऱ्यांसाठी, शेतीसुधारणेसाठी, तुरुंगसुधारणेसाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की, स्वत:च्या पारलौकिक कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही; पण त्या दीनांची कायमची उन्नती व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याचे त्याचा प्रश्न सुटत नाही, तो सोडविण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदित झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांती झाली असती. पाश्चात्य समाज उत्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबुद्धीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ती एवढेच म्हणता येईल आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाही, या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायांतून निवृत्त झाला आणि आयुष्याची पुढली 45 वर्षे संपत्ती दान करण्यातच खर्च केली. रुगणलये, वैद्यकीय संशोधन, शास्त्रीय संशोधन, ग्रंथालये, सार्वजनिक इमारती, शांततेसाठी प्रयत्न करणारी मंडळे, धर्मसंस्था या सर्वांना त्याने कोटीकोटी रुपयांचे दान केले या दानामध्ये मानवजातीचे कल्याण हा एकच हेतू होता. ‘अखिल विश्वातला मानव’ हे त्याचे लक्ष्य होते.

संतांच्या उपदेशातून आपण कोणती प्रेरणा घेतली नाही, असे लेखकाचे मत आहे.

  1. दान देण्याची
  2. सामाजिक धर्माची
  3. धर्म वाढवण्याची
  4. धन संचयाची

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : सामाजिक धर्माची

उतारावाचन Question 5 Detailed Solution

धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही.

उतारावाचन Question 6:

Comprehension:

आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.

सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.

सहकारी चळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी ळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्‍कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.

सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या

वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.

सेवा आणि उद्योग या क्षेत्रांवर कशाचा दूरगामी परिणाम होत आहे?

  1. औद्द्योगिकरण
  2. भांडवलशाही
  3. जागतिकीकरण
  4. मुक्त अर्थव्यवस्था

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : जागतिकीकरण

उतारावाचन Question 6 Detailed Solution

उत्तर: जागतिकीकरण

स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा नुसार, या आधुनिक काळात, सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे आणि याच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.

उतारावाचन Question 7:

Comprehension:

​पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.

आज अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ते वर कायम प्रश्न उपस्थित केले जातात त्याच शाळेचे शिक्षक श्री. रणजितसिंह डीसले गुरुजींनी "जागतिक शिक्षक पुरस्कार" मिळवला याचा अर्थ काळ बदलतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारतोय हे आश्वासक उदाहरण आहे. यातून पालकांनी धडा घ्यावा पालकांनी मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य द्यावे. ज्या पालकांना इंग्रजी भाषा चांगली लिहिता वाचता व बोलता येत असेल त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार केला तर तो त्यांचा निर्णय त्यांना आपण रोखू शकणार नाही.. अनेक शिक्षण तज्ञांनी सांगितले आहे कि मातृभाषेतून मुल लवकर शिकते. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही. खरं तरं, मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल. याचा अर्थ असा नाही की, परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरूर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा, पण आपण आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती - तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क - क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोट्या छोट्या कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच 'अल्प योगदान' दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा 'किमान भाषा वापर' असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित 'भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम' आहे. हल्ली सगळेकडेच इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसत आहे. असे असले तरी काही मराठी वृत्तपत्रे मराठी भाषेला प्राधान्य देऊन इंग्रजी शब्द टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वाचकांची मानसिकता लक्षात घेता हे इंग्रजी शब्द वाचकांच्या अंगवळणी पडल्याने वृत्तपत्रांना इंग्रजी शब्दांना उपयोग करणे भाग पडते. मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल आणि तरच येणारी पुढची पिढी टिकेल. आपली जडणघडण ही आपली बोली भाषेतूनच होत असते. लोकांचा असा समज आहे की परकीय भाषा आली तरच आपला विकास होईल. आपला खरा संबंध हा मातृभाषेशी असतो. मातृभाषा आपली आईच असते. या मातृभाषेचे संवर्धन आपणच केले पाहिजे असे मला वाटते. मुळात मराठी भाषा जतन करण्यापेक्षा समृद्ध केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे.

लेखकाला पुढीलपैकी कोणती गोष्ट शक्यप्राय वाटते?

  1. लहान लहान कृतीतून काहीही न करणे.
  2. मनस्वी अभिमान न बाळगणे.
  3. सक्रिय कार्यकर्त्यांना सहकार्य करणे.
  4. भाषेसाठी काहीही न सोडणे.
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : सक्रिय कार्यकर्त्यांना सहकार्य करणे.

उतारावाचन Question 7 Detailed Solution

  • मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल असे लेखकांना वाटते.
  • दुसऱ्या भाषेबद्दल द्वेष मनात येऊ न देता आपल्या भाषेवर आलेल्या आव्हानांना तोंड द्यावे, असे ते म्हणतात.
  • भाषेच्या अभिमानासाठी आपण एखादी कृती करू शकत नाही का तसेच भाषेसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण आपल्या परीने मदत नाही करू शकणार का हे प्रश्न लेखकाला पडतायेत.
  • आणि अशा प्रकारे सक्रिय कार्यकर्त्यांना सहकार्य करणे ही गोष्ट लेखकांना शक्यप्राय वाटते.

उतारावाचन Question 8:

Comprehension:

पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.

माझ्या समाजकार्याच्या निमित्ताने एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक लोकांची आर्थिक किंवा अन्य काही स्वरुपाची मदत करण्याची इच्छा असते. श्रीमंत लोक जास्त मोठी देणगी देत असतील, असा आपला समज असतो; पण ते तितकसं खरं नाही. त्याउलट मध्यमवर्गीय व कनिष्ट मध्यमवर्गीय लोकच सढळ हाताने मदत करतात.
काही वर्षांपूर्वी मला बंगलोरमधील एका मोठ्या कंपनीत व्याख्यानाचं निमंत्रण आलं. विषय होता - 'मोठ्या कंपन्यांची सामाजिक जबाबदारी'. माझ्या भाषणानंतर काही तरुण मुलंमुली मला येऊन भेटली. कंपनी चांगलीच श्रीमंत होती. कंपनीत काम करणारे सर्वच उत्तम परिस्थितील होते. स्वाभाविकच त्यांचे कपडे वगैरे उंची होते. माझ्या भाषणानंतर सर्वजण भारावून गेले होते. ‘मॅडम, आम्ही दर महिन्याला इतके कपडे विकत घेतो. या भूकंपग्रस्त लोकांसाठी आम्ही आमचे जुने कपडे पाठवले तर चालतील का? तुम्ही त्याची जबाबदारी घेऊन ते कपडे त्यांच्यापर्यंत पोहचते कराल का?” त्यांच्यापैकी काहींनी इतरही काही वस्तू देणगीरूपात देण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्या सर्वांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद झाला. रामाने जेव्हा लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्यास सुरवात केली, तेव्हा एका चिमुकल्या खारीने पुढे होऊन एका मुठभर वाळूची कशी मदत केली, या गोष्टीची मला आठवण झाली.
'तुम्ही जमा केलेल्या थैल्या माझ्या ऑफिसात पाठवून द्या. त्यातील गोष्टी योग्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची मी व्यवस्था करीन.'

त्यानंतर सुमारे आठवडाभरातचं शेकडो बॅगा येऊन पोहोचल्या. त्यानं माझं ऑफिस भरून गेलं. आपल्या भाषणाचा हा इतका चांगला परिणाम झालेला पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला. एका रविवारी मी माझ्या मदतनिसांना बरोबर घेऊन त्या बॅगा उघडण्यास सुरवात केली. आतून ज्या काही गोष्टी बाहेर आल्या, त्या पाहून आम्ही थक्क झालो. आम्हाला धक्का बसला. फाटक्यातुटक्या विजोड उंच टाचांच्या चपला, फाटकी अंतर्वस्त्रं, न धुतलेले शर्ट, झिरझिरीत सवंग साड्या, धड आकार वा रंग सुद्धा नसलेली खेळणी, वापरण्यायोग्य न राहिलेली अंथरुण-पांघरुणं, ॲल्युमिनियमची भांडी, फुटक्या कॅसेट्स अशा गोष्टींचा मोठा ढीग आमच्यासमोर तयार झाला. त्यात चांगले शर्ट, साड्या व वापरण्यायोग्य वस्तू अगदी थोड्याच होत्या.
एक गोष्ट उघडच होती. ज्या गोष्टी भंगारवाल्याकडे पोहोचवायच्या, त्या वस्तू या लोकांनी देणगीच्या नावाने माझ्या ऑफिसात पाठवून दिल्या होत्या. त्यादिवशी मला भेटलेले सर्वच स्त्री-पुरुष बुद्धिमान होते, भरपूर प्रवास केलेले, सधन लोक होते. अशा सुशिक्षित लोकांचं जर हे वागणं असेलं, तर मग अशिक्षित लोकांनी काय करावं?

"रामाने जेव्हा लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्यास सुवात केली, तेव्हा एका चिमुकल्या खारीने पुढे होऊन एका मुठभर वाळूची मदत केली". अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

  1. शब्दयोगी अव्यय
  2. उभयान्वयी अव्यय
  3. विशेषण
  4. सर्वनाम
  5. क्रियाविशेषण

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : उभयान्वयी अव्यय

उतारावाचन Question 8 Detailed Solution

उत्तर- उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय-

  • वरील वाक्यात आलेला अधोरेखित शब्द 'जेव्हा' हे एक उभयान्वयी अव्यय आहे.
  • दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
  • याचा अजून खोलात जाऊन विचार करता आपण 'जेव्हा' या शब्दाचा प्रकार जाणून घेऊ.

Important Pointsपरिणाम बोधक उभयान्वयी अव्यय-

जेव्हा दोन वाक्यांना जोडणार्‍या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणार्‍या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत,जेव्हा, तेव्हा, तस्मात इत्यादी.

अशाप्रकारे "रामाने जेव्हा लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्यास सुरूवात केली, तेव्हा एका चिमुकल्या खारीने पुढे होऊन एका मुठभर वाळूची मदत केली". यातील अधोरेखित शब्दाची जात उभयान्वयी अव्यय आहे.

उतारावाचन Question 9:

Comprehension:

पुस्तके मेंदूसाठी उत्तम आहार आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे की, मानवसमूहाने आत्तापर्यंत केलेला विचार, कृती आणि शोध पुस्तकांमधून जतन करुन ठेवले आहेत. मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचे श्रेय पुस्तकांना जाते. त्यामुळेच पुस्तकांचे महत्त्व अतुलनीय आहे. पुस्तकाने आपले अंतःकरण उजळून निघते. उत्तम पुस्तके माणसाला असंस्कृतपणाकडून सुसंस्कृतपणाकडे नेतात, त्याच्यातील सात्त्विक भाव जागृत करुन त्याला पथभ्रष्ट होण्यापासून परावृत्त करतात आणि समाज व राष्ट्राचे मार्गदर्शन करतात. पुस्तके ही प्रेरणादायी असतात आणि त्यांचा आपल्या मन व बुद्धिवर दीर्घकालीन प्रभाव असतो. मनोरंजनाचे साधन म्हणूनही पुस्तकांकडे पाहिले जाते. इथे मनोरंजन या शब्दाचा अर्थ निव्वळ करमणूक नसून, तो अधिक गहन आहे. जी पुस्तके माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करतात, त्याच्या हृदयाला भिडतात तीच खऱ्या अर्थाने मनोरंजनप्रधान पुस्तके आहेत. अशी लक्षवेधी पुस्तके वाचकाला सुखावत असतात. यादृष्टीने हलके-फुलके साहित्यदेखील कमी महत्त्वाचे नसते. असे साहित्य मोठ्याप्रमाणात माणसांचा ताण कमी करतात. आणि त्यांना नैराश्यातून बाहेर काढतात. उत्तम पुस्तके माणसाच्या ज्ञानवर्धानाचे आणि आनंदाचे साधन आहे विज्ञान, वाणिज्य, कला आणि न्यायशास्त्रावरील पुस्तकांनी माणसाच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे. पुस्तकांच्या वाचनातून माणसाला एकप्रकारचे आत्मबल प्राप्त होते. पुस्तके खऱ्या अर्थाने आपले मार्गदर्शन करतात. पुस्तके ज्ञानवर्धन करतात, नवनवीन रहस्ये उलगडून दाखवितात आणि चिंतन-मनन करण्यासही प्रवृत्त करतात. पुस्तके आपल्याला द्विधामनस्थितीतून बाहेर काढतात व सक्षम बनवितात. गांधीजींनी गीतेला आई म्हटले आहे. कारण प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांना गीतेतून मार्गदर्शन लाभले होते. पुस्तक हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे कधी रागावत नसते, शिक्षा करीत नसते किंवा मोबदल्यात काहीही मागत नसते. उलट अक्षरत्त्वाचे सत्त्व बहाल करते. पुस्तके माणसाला सुख देतात. पुस्तकात रमणारा माणूस सहसा नैराश्यात सापडत नाही किंवा रितेपणा अनुभवत नाही. वैचारिक संघर्षात पुस्तके उत्तम आयुध ठरतात. पुस्तकातील विचारांमध्ये संपूर्ण समाजाला बदलण्याचे सामर्थ्य असते. सध्याचे जग हे विचारांचे जग आहे. समाजात होणारे बदल किंवा क्रांती यांची सुरुवात विचारधारेतूनच होत असते.

उत्तम पुस्तके माणसामध्ये कोणते चांगले बदल घडवून आणतात?

1. पुस्तकाने आपले अंतःकरण उजळून निघते.

2. उत्तम पुस्तके माणसाला संस्कृतपणाकडून असंस्कृतपणाकडे नेतात.

3. माणसातील सात्त्विक भाव जागृत करुन त्याला पथभ्रष्ट होण्यापासून परावृत्त करतात.

4. पुस्तकांचा आपल्या मनावर व बुद्धीवर अल्पकालीन प्रभाव असतो.

  1. विधान 1 आणि 2
  2. विधान 3 आणि 4
  3. विधान 1 आणि 3
  4. विधान 2 आणि 4

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विधान 1 आणि 3

उतारावाचन Question 9 Detailed Solution

उत्तर- विधान 1 आणि 3

स्पष्टीकरण- 

  • प्रस्तुत उताऱ्यामध्ये पुस्तकांचे माणसाच्या जीवनामध्ये काय स्थान आहे याबद्दलचे विस्तारित विश्लेषण केले आहे.
  • पुस्तके मेंदूसाठी उत्तम आहार आहेत, असे लेखक म्हणतात.
  • कधी ज्ञानार्जनासाठी तर कधी मनोरंजनासाठी; कधी ताण कमी करण्यासाठी तर कधी व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला जातो.
  • प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने उत्तम पुस्तके माणसामध्ये कोणते चांगले बदल घडवून आणतात, याबद्दल सांगितले आहे.
    • पुस्तकाने आपले अंतःकरण उजळून निघते.
    • उत्तम पुस्तके माणसाला असंस्कृतपणाकडून सुसंस्कृतपणाकडे नेतात.
    • पुस्तकांचा आपल्या मनावर व बुद्धीवर दीर्घकालीन प्रभाव असतो.
    • पुस्तके माणसातील सात्त्विक भाव जागृत करुन त्याला पथभ्रष्ट होण्यापासून परावृत्त करतात आणि समाज व राष्ट्राचे मार्गदर्शन करतात.

 

अशा प्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ विधान 1 आणि 3 हीच विधाने योग्य आहेत.

उतारावाचन Question 10:

Comprehension:

पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.

अनुभवातून मी नेहमी असं म्हणतो, की जगातलं सगळ्यात मोठं हृदय आणि सगळ्यात मोठा मेंदू हत्तीजवळ आहे. निर्णय हा माणसाचा आहे, कि मेंदूत बसायचं कि हृदयात! कारण मेंदूत हत्तीच्या आकाराचा राग असू शकतो, तर हृदयात हत्तीच्या आकाराचे प्रेम. या सदरामध्ये हत्तीच्या शरीराची साधी ओळख आपण करून घेऊ.

शरीराच्या मानानं हत्तीचे डोळे अतिशय लहान असतात. लहान असले तरी खूप बोलके असतात. हत्तीबरोबर राहून त्यांच्या डोळ्यांतले भाव मला सहज समजू लागले. अतिशयोक्ती नाही, पण उत्सुकता, आश्चर्य, नवल वाटणं, खट्याळपणा, काही वेळेला राग किंवा लटका राग हे त्यांच्या डोळ्यांतून सहजपणे समजायला लागलं आहे. फार लांबचं बघण्याची त्या डोळ्यांची क्षमता नसते. डोळ्यांच्या बुबुळाला बाहेरच्या भागात आकर्षक असं एक पांढरं वर्तुळ असतं. डोळ्यांच्या संरक्षणासाठी जाडसर पापण्याही असतात. हत्तीची सोंड म्हणजे एकाचवेळी बरीच कामं करणारा अवयव असतो. ती सोंड हत्तीचं नाकही असते आणि वरचा ओठही असतो. एकोप्यानं काम करणारे हजारो स्नायू त्या सोंडेमध्ये असतात. ती सोंड हत्तीच्या हाताचं कामही करते. सोंडेच्या टोकाला असलेला अंगठा आणि मुठ हे अगदी रुपयाचं नाणं ते गवताची एक काडी उचलण्याइतके सक्षम असते.

आशियाई हत्तीच्या सोंडेच्या टोकाला एक अंगठा व एक मुठ असते, तर आफ्रिकेच्या हत्तीच्या सोंडेच्या टोकाला दोन अंगठे असतात. या नाकाची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे मिट्ट अंधारातही सोंडेच्या आधारावर ते सहज मार्गक्रमण करतात. सोंड त्यांचं शस्त्रही असते. प्रचंड वजनाच्या किंवा अडथळ्याच्या गोष्टी हत्ती सोंडेने सहज बाजूला करत असतो. अशा जमिनीवरच्या गोष्टी हत्ती उचलतो, तसंच पुढचे दोन पाय हवेत ठेवून झाडाच्या उंच फांद्याही तोडतो. दुष्काळाच्या काळात जर सुकलेल्या नदीपात्रातून हत्ती चालत असेलं तर सोंडेने जमिनीखाली कुठे पाण्याचा झरा आहे का ते शोधू शकतो आणि पायांनी ते खणून काढतो. पाणी पितो आणि पुढे जातो. माणूस जसा हाताच्या वापरावरून डावरा की उजवा आहे हे आपण ठरवतो तसंच हत्तीच्याही सुळ्यांच्या वापरावरून तो डावरा की उजवा आहे हे आपल्याला कळतं हत्तीचा जो सुळा जास्त झिजलेला असेलं तो जास्त वापरलेला असतो. जर डावा झिजला असेलं तर हत्ती डावरा असतो, इतक्या सहज आपण ओळखू शकतो. आफ्रिकेतील नर आणि मादी या दोन्ही हत्तींना सुळे असतात. आशियाई हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठे सुळे असतात, तर मादीला अगदीच न दिसणारे छोटे सुळे असतात. सुळे हे हत्तीच्या सौंदर्याचे प्रतिक असतं. तसंच त्यांच्या ताकदीचा मापदंडही मानला जातो. एखाद्याला आव्हान देण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हांमध्ये सुळ्यांचं जमिनीत खुपसणं हाही एक प्रकार असतो. काही वेळा तुम्हाला खेळाचं निमंत्रण देण्यासाठीही हत्ती जमिनीत सुळा खुपसत असतो.

विशेषण नसलेला पर्याय निवडा.

  1. डावरा
  2. लहान
  3. केस
  4. मिट्ट

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : केस

उतारावाचन Question 10 Detailed Solution

विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास ‘विशेषण' असे म्हणतात.

उदा. काळा कुत्रा, हिरवे रान, पाच टोप्या इ. 

काळा, हिरवे, आणि पाच ही नामांची विशेष माहिती सांगतात म्हणून ही नामांची विशेषणे आहेत. 

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत-

  1. गुणविशेषण
  2. संख्याविशेषण
  3. सार्वनामिक विशेषण

Important Pointsस्पष्टीकरण-

मिट्ट काळोख, लहान मुलगा आणि डावरा हात, यातील ठळक केलेले शब्द हे विशेषण आहेत.

प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ केस हे विशेषण नाही.

Get Free Access Now
Hot Links: teen patti rules teen patti master apk best teen patti master old version