म्हणी MCQ Quiz - Objective Question with Answer for म्हणी - Download Free PDF

Last updated on Apr 14, 2025

Latest म्हणी MCQ Objective Questions

म्हणी Question 1:

‘काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीचा नेमका अर्थ काय? 

  1. आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे
  2. गेलेल्या गोष्टीचा शोक करत बसणे
  3. धावा धाव करणे
  4. नको त्या गोष्टीचा शोध घेणे
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे

म्हणी Question 1 Detailed Solution

उत्तर - काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

म्हणी Question 2:

'वाईट काम करणान्याला सतत धास्ती वाटते' हा अर्थ व्यक्त करणारी म्हण शोधा.

  1. खाई त्याला खवखवे
  2. साखरेचे खाणार त्याला देव देणार
  3. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  4. खायला काळ आणि भुईला भार

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : खाई त्याला खवखवे

म्हणी Question 2 Detailed Solution

उत्तर: 1) खाई त्याला खवखवे

Key Points
स्पष्टीकरण:

  • खाई त्याला खवखवे: वाईट काम करणाऱ्याला सदैव धास्ती किंवा भीती वाटते, कारण त्याच्या चुकीच्या कृत्यांचा त्याला त्रास होतो. ही म्हण दिलेल्या अर्थाशी जुळते.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार: चांगले कर्म करणाऱ्याला फळ मिळते, ही सकारात्मक कृतीशी संबंधित आहे.
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी: ऐशआराम किंवा पूर्ण उपासमार या दोन टोकांमध्ये जगणे, ही म्हण दिलेल्या अर्थाशी संबंधित नाही.
  • खायला काळ आणि भुईला भार: निरुपयोगी आणि फक्त जमिनीवर ओझे असणे, याचा अर्थ वाईट कृत्याच्या भीतीशी संबंधित नाही.

म्हणून, 'खाई त्याला खवखवे' ही म्हण 'वाईट काम करणाऱ्याला सतत धास्ती वाटते' या अर्थाला सुसंगत आहे.

म्हणी Question 3:

'काप गेले भोके राहिली' या म्हणीचा अर्थ- 

  1. वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या
  2. ऐपत नसतांना फार घाटमाट केला
  3. लाजलज्जा पार सोडून देणे
  4. करायला गेले एक अन् झाले भलतेच

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या

म्हणी Question 3 Detailed Solution

उत्तर वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या

Key Points

  • 'काप गेले भोके राहिली' ही म्हण वापरली जाते तेव्हा जेव्हा काहीतरी मूलतत्त्व नष्ट झाले आहे पण त्याच्या चिन्हे किंवा खुणा तसेच उरल्या आहेत.
  • याचा अर्थ असा होतो की काहीतरी मूळ गोष्टी गेल्या आहेत पण त्याची उरलेली खुणा अजूनही स्पष्ट दिसतात.
  • त्यामुळे ही म्हण त्या गोष्टींविषयी वापरली जाते ज्याचे मूळ नष्ट झाले आहे पण खुणा कायम आहेत.
  • तर, योग्य पर्याय आहे: वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या

म्हणी Question 4:

पुढील म्हण पुर्ण करा. आडात नाही तर _______ कुठुन येणार ? 

  1. बादलीत 
  2. घागरीत 
  3. पोहऱ्यात
  4. यापैकी नाही.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : पोहऱ्यात

म्हणी Question 4 Detailed Solution

उत्तर: पोहऱ्यात

Key Points

  •  "आडात नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार?" ही म्हण याचा अर्थ असा होतो की, जर उपयुक्त साधने किंवा सामुग्री उपलब्ध नसेल तर योजनाबद्ध काम किंवा उद्दिष्ट कसा साध्य होईल?
  • ही म्हण आपल्याला संदेश देते की, यशस्वी व्हायचे असेल तर योग्य साधने व उपाययोजना असणे आवश्यक आहे.
  • जर विहीरीत पाणी असेल तर त्या बादलीत पाणी येईल असा सरळ अर्थ झाला.
  • व्यवहारात जगताना आपण अनेक संकटाना तोंड देत असतो. त्यापासून सुटका करण्यासाठी आपल्या मनानेच काही उपाययोजना करत असतो पण ती समजा फसली , अजुन काही विपरीत घडले तर आजुबाजूचे विघ्नसंतोषी लोक त्यावर टिका करायचा मोका सोडत नाहीत. आपल्या अकलेचे ( ज्ञानाचे ) धिंडवडे काढतात. तेव्हा हमखास म्हणणार " आडात नाही तर पोहरयात कुठून येणार " . म्हणजे हा माणुस अक्कलशून्य आहे.अकलेचा पत्ता नाही. असे उपरोधिक बोलणे ऐकावे लागते.

म्हणी Question 5:

पुढील म्हण पुर्ण करा - कामा पुरता मामा, ताकापुरती ______

  1. मामी 
  2. मावशी 
  3. आजी 
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : आजी 

म्हणी Question 5 Detailed Solution

उत्तर: आजी 

स्पष्टीकरण:

वरील म्हणीचे अर्थ:

1) कामा पुरता मामा - ताकापुरती आजी → आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.

Top म्हणी MCQ Objective Questions

'नाकाचा बाल' या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

(a) अत्यंत अडचणीची परिस्थिती

(b) अत्यंत सुरक्षित

(c) अत्यंत अप्रिय व्यक्ती

(d) अत्यंत प्रिय व्यक्ती

  1. फक्त (a) व (c) बरोबर, (b) व (d) चूक
  2. फक्त (c) व (d) बरोबर, (a) व (b) चूक
  3. फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक
  4. फक्त (b) बरोबर, (a), (c) व (d) चूक

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक

म्हणी Question 6 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- फक्त (d) बरोबर, (a), (b) व (c) चूक

स्पष्टीकरण- नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय / जिवलग व्यक्ती

अशा प्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ (d) अत्यंत प्रिय व्यक्ती हा पर्याय योग्य आहे.

Additional Informationम्हण-

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

महापुरें झाडें जाती । तेथें लव्हाळें वाचतीं । या म्हणीची समानार्थी म्हण कोणती ?

  1. उथळ पाण्याला खळखळाट फार
  2. दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी
  3. जशी देणावळ तशी धुणावळ
  4. कोळसा उगाळावा तितका काळाच

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी

म्हणी Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी

म्हण-

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 

- दृष्टीआड सृष्टी 

  1. दृष्टीत दोष असणे 
  2. दुर्लक्ष करणे 
  3. आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 
  4. दृष्टीशिवाय आपणाला सृष्टी दिसू शकत नाही 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही 

म्हणी Question 8 Detailed Solution

Download Solution PDF

म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही हा होतो.

‘दीड हळकुंडात पिवळी' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

  1. थोड्याशा यशाने हुरळून जाणे 
  2. दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसते
  3. एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे
  4. कोणतेही काम पूर्ण न करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : थोड्याशा यशाने हुरळून जाणे 

म्हणी Question 9 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ कोणतेही काम पूर्ण न करणे असा होतो.

'रामभाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे' हा आशय सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती ?

  1. हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका
  2. शेरास सव्वा शेर
  3. पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा
  4. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

म्हणी Question 10 Detailed Solution

Download Solution PDF

म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. 

याठिकाणी दुसऱ्याचे पैसे आपले म्हणून तिसऱ्याला दिले आहेत यासाठी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देणे ही म्हण योग्य होईल.

Additional Informationहाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका म्हणजे डोक्‍याकडे धरावयास जावे तो टक्‍कल पडलेले असल्‍यामुळे धरण्यास केस इ. नसलेला व हातात धरावयास जावे तर रोड असल्‍यामुळे हातांतून सहज निसटणारा याप्रमाणे ज्‍याचे काहीच हातात लागणार नाही असा कफल्‍लक, निष्‍कांचन मनुष्‍य.

शेरास सव्वाशेर म्हणजे एकाला दुसरा वरचढ होणे.

पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे जशी मजुरी तसे काम. मजुरी, वेतन थोडे असेल तर कामही थोडेच अशी स्थिति असणे.

'पी हळद अन हो ______' ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे ?

  1. काळी
  2. पांढरी
  3. गोरी
  4. पिवळी

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गोरी

म्हणी Question 11 Detailed Solution

Download Solution PDF

म्हण- 

  • कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

Important Points

पी हळद अन हो ______  ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी प्रस्तुत पर्यायांपैकी गोरी हा शब्द योग्य राहील. 

पूर्ण म्हण पी हळद अन हो गोरी अशी होईल.

म्हणीचा अर्थ- एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा करणे.

'काळ्या दगडावरची रेघ' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. 

  1. न बदलणारी गोष्ट
  2. मोठ्या माणसांतही दोष असतात.
  3. अन्याय सहन करावा लागणे
  4. एखाद्या गोष्टीशी संबंध नसणे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : न बदलणारी गोष्ट

म्हणी Question 12 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - काळ्या दगडावरची रेघ या म्हणीचा योग्य अर्थ न बदलणारी गोष्ट हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' - म्हणीचा अर्थ सांगा.  

  1. मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो
  2. प्रत्येकाचा मृत्यू कधी ना कधी होतोच 
  3. स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करावे लागते
  4. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

म्हणी Question 13 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही हा होतो.

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजेच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

'महिन्याची अखेर होती, त्यात 4, 5 पाहुणे घरी आले' याप्रसंगी कोणती म्हण लागू पडेल ? 

  1. न कर्त्याचा वार शनिवार
  2. गरज सरो वैद्य मरो
  3. तेरड्याचा रंग तीन दिवस
  4. दुष्काळात तेरावा महिना

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : दुष्काळात तेरावा महिना

म्हणी Question 14 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - महिन्याची अखेर होती, त्यात 4, 5 पाहुणे घरी आले याप्रसंगी दुष्काळात तेरावा महिना ही म्हण योग्य ठरेल.

दुष्काळात तेरावा महिना याचा अर्थ अगोदरच्या संकटात आणखी भर पडणे असा होतो.

महिन्याची अखेर म्हणजे पैसे संपलेले असतात. अशा वेळी अचानक 4-5 पाहुणे घरी आले तर ते एक आव्हानच असते. यासाठी पैसे, अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची तयारी नसते. त्यामुळे "दुष्काळात तेरावा महिना" ही म्हण या प्रसंगी योग्य ठरेल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

Additional Information

  • न कर्त्याचा वार शनिवार याचा अर्थ ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो असा होतो.
  • गरज सरोवैद्य मरो याचा अर्थ एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे असा होतो.
  • तेरड्याचा रंग तीन दिवस याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते असा होतो.

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

दाम करी काम.

  1. मोठया माणसात दोष असतात. 
  2. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
  3. सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
  4. पैशाने सर्व कामे साध्य होतात.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : पैशाने सर्व कामे साध्य होतात.

म्हणी Question 15 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - दाम करी काम या म्हणीचा योग्य अर्थ पैशाने सर्व कामे साध्य होतात हा होतो.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

Additional Information

  • दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ मोठया माणसात दोष असतात हा होतो.
  • नागीण पोसली आणि पोसणार्‍याला डसली या म्हणीचा अर्थ वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते असा होतो.
  • पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते हा होतो.
Get Free Access Now
Hot Links: teen patti rummy 51 bonus teen patti gold apk teen patti gold old version teen patti master apk best